बसववचनांचा सुलभ अनुवाद
घनगर्द भरलेलं आभाळ नेहमी अमृताचा वर्षाव करतं, तर जमिनीच्या उदरात असंख्य बीजं लपलेली असतात. पण अंकुर फुलतील कसे? आणि अशातच पावसाचा आभाळापासूनचा सुरू झालेला प्रवास जमिनीजवळ येऊन थांबतो अन् जमिनीच्या उदरातली बीजं अंकुरांतून फुलायला लागतात.
बाराव्या शतकातील म० बसवेश्वरांची वचने सर्व जगाला आजच्या घडीला सुद्धा मार्ग दाखविणारी आहेत. चंदनाने कपाळ सुशोभित करताना नकळत माथ्यापर्यंत पोहोचलेली बोटंही सुगंधित होतात, असंच या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल. अध्यात्माचा सुगंध असलेली ही चंदनरूपी वचने सर्वांनाच सुगंधित करतील.
हे पुस्तक हाती आले आणि वाचता वाचता डॉ० स्वामी यांची या लेखनामागची सात्त्विक पार्श्वभूमी लक्षात आली की, संपूर्ण मानवजातीला मानवकल्याणाची, धर्माची, नैतिकतेची जाणीव या वचनांतून व्हावी. जगाला मानवकल्याणाचा मार्ग दाखविणारे, अध्यात्मातून विज्ञानवादाचे दर्शन घडविणारे, उच्चनीचता समूळ नष्ट व्हावी, स्त्रीपुरुष-समानतेचा गौरव व्हावा अशी उच्च विचारसरणी असलेले समाजातील आद्य प्रवर्तक म० बसवेश्वरांची वचने, त्यांचा मराठीत भावानुवाद व त्यावरील भाष्य या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल.
धर्म म्हणजे काय, धर्माचं मूळ काय, शिकवण काय हे सहजतेने मांडणारे वचन...
दयविल्लद धर्मयावुदय्य । दयवे बेकु सर्व प्राणिगळल्लि ।
दयवे धर्मद मूलवय्य । कूडल संगय्यनंतल्लदोल्लनय्या॥
दया नसणारा तो धर्म कोणता, दया पाहिजे सर्व प्राण्यांविषयी,
दया धर्माचं मूळ आहे, दया नसेल तर कूडलसंगय्य कसा प्रसन्न होईल?
अशा वचनावर अनुवादानंतर डॉ० स्वामी यांनी केलेलं भाष्य सुरेख आहे.
शरणांच्या भालप्रदेशी शोभून दिसणारी विभूती हा शरणांचा सुरेख, स्वाभाविक अलंकारच. त्या विभूतीचे महत्त्व सांगणारे वचन...
नीरिगे नैदिलेये शृंगार । समुद्रक्के तेरेय शृंगार ॥
नारिगे गुणवे शृंगार । गगनक्के चंद्रमने शृंगार ॥
मानवजन्माचं उद्दिष्ट हे ईश्वर प्राप्त करून घेणं असलं पाहिजे. भौतिक सुख हे शाश्वत समाधान देत नाही, हे सांगताना म० बसवेश्वर म्हणतात...
समुद्रदोळगण सिंपिनंते बायि बिडुत्तिद्देनय्य
नीवल्लदे मत्तारु यन्नवरिल्ल नोडय्य
कूडलसंगमदेव
नीवल्लदोळ कोंबुवरिल्ल नोडय्य
अशी अनेक वचने या पुस्तकात वाचायला मिळतात. वचनांवर भाष्य करताना डॉ० स्वामींचं लेखन सहज मनाला भिडतं. भाष्य करताना डॉ० स्वामी स्वत: त्या वचनांशी किती समरस झाले याचा प्रत्यय वारंवार भाष्य वाचताना, त्यात दिलेल्या सामान्यांना पटेल अशा उदाहरणांवरून येतो. प्रत्येकापर्यंत भावार्थ पोहोचविण्याचा डॉ० स्वामींचा प्रयत्न खूपच प्रशंसनीय वाटतो. त्यातील सहजता मनाला भावणारी आहे.
‘बसवबोध’ हे पुस्तक सर्व वाचक-भक्तांचे प्रबोधन करणारे, त्यांच्या सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक जाणिवा प्रगल्भ करणारे आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ देखणे, म० बसवेश्वरांच्या सुरेख, सात्त्विक रूपाचे दर्शन घडविणारे आहे.
या पुस्तकातील वचने, भावानुवाद, भाष्य यांतील शब्दांची, वाक्यांची मांडणी सुटसुटीत आहे. शेवटी समाविष्ट केलेला भाग- मंगळवेढा येथील बसव साहित्य संमेलनातील डॉ० इरेश स्वामी यांचे अध्यक्षीय भाषण, म० बसवेश्वरांची शिकवण, सुभाषिते इत्यादी सुद्धा प्रेरक आहे.
प्रत्येकाने वाचावे, संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. म० बसवेश्वरांच्या वचनांना समाजापर्यंत नेणार्या या कार्यासाठी डॉ० स्वामींचे शतदा आभार. त्यांच्या लेखनकार्यास शुभेच्छा!
बसवबोध
डॉ० इरेश सदाशिव स्वामी,
विविधा प्रकाशन,
‘विद्या’, १२, ब्रह्मचैतन्य नगर,
विजापूर रस्ता, सोलापूर ४१३ ००४
चरभाष ९३७१०९९५००
बसवबोध
स्वाती साखरकर कराळे
एम०एस्सी०, एम०एड्०, बी०ए० (मराठी)
मानवी जीवनाचंही असंच आहे. त्याच्या अनाकलनीय अशा हृदयात अध्यात्माची, उत्सुकतेची, जाणिवेची अनेक बीजं निद्रावस्थेत असतात. पण संतवचनांचा अमृतस्पर्श एकदा का या बीजांना झाला की त्या स्पर्शाने बीजांचे अमृतवेलीत रूपांतर होते. वीरशैव धर्मात संतांनी अनेक वचनांचे अमृतकुंभ जगाला भरभरून दिलेले आहेत. त्या अमृताचे थेंब सामान्यातून सामान्य जीवांपर्यंत पोहोचावे यासाठी तेवढ्याच आत्मीयतेने कार्य करणारे संतसाहित्यकार, अभ्यासक समाजात आहेत याचा आपल्याला सार्थ अभिमान असावाच.
‘बसवबोध’ हे म० बसवेश्वरांच्या वचनांचे पुस्तक एखाद्या अमृतकुंभाप्रमाणे डॉ० इरेश स्वामी यांनी आपल्यासमोर आणले आहे. किती घ्यावं तेवढं कमीच, असा अनुभव प्रत्येकालाच हे शब्दरूपी अमृत प्राशन करताना येणार हे निश्चित!बाराव्या शतकातील म० बसवेश्वरांची वचने सर्व जगाला आजच्या घडीला सुद्धा मार्ग दाखविणारी आहेत. चंदनाने कपाळ सुशोभित करताना नकळत माथ्यापर्यंत पोहोचलेली बोटंही सुगंधित होतात, असंच या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल. अध्यात्माचा सुगंध असलेली ही चंदनरूपी वचने सर्वांनाच सुगंधित करतील.
हे पुस्तक हाती आले आणि वाचता वाचता डॉ० स्वामी यांची या लेखनामागची सात्त्विक पार्श्वभूमी लक्षात आली की, संपूर्ण मानवजातीला मानवकल्याणाची, धर्माची, नैतिकतेची जाणीव या वचनांतून व्हावी. जगाला मानवकल्याणाचा मार्ग दाखविणारे, अध्यात्मातून विज्ञानवादाचे दर्शन घडविणारे, उच्चनीचता समूळ नष्ट व्हावी, स्त्रीपुरुष-समानतेचा गौरव व्हावा अशी उच्च विचारसरणी असलेले समाजातील आद्य प्रवर्तक म० बसवेश्वरांची वचने, त्यांचा मराठीत भावानुवाद व त्यावरील भाष्य या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल.
धर्म म्हणजे काय, धर्माचं मूळ काय, शिकवण काय हे सहजतेने मांडणारे वचन...
दयविल्लद धर्मयावुदय्य । दयवे बेकु सर्व प्राणिगळल्लि ।
दयवे धर्मद मूलवय्य । कूडल संगय्यनंतल्लदोल्लनय्या॥
दया नसणारा तो धर्म कोणता, दया पाहिजे सर्व प्राण्यांविषयी,
दया धर्माचं मूळ आहे, दया नसेल तर कूडलसंगय्य कसा प्रसन्न होईल?
अशा वचनावर अनुवादानंतर डॉ० स्वामी यांनी केलेलं भाष्य सुरेख आहे.
शरणांच्या भालप्रदेशी शोभून दिसणारी विभूती हा शरणांचा सुरेख, स्वाभाविक अलंकारच. त्या विभूतीचे महत्त्व सांगणारे वचन...
नीरिगे नैदिलेये शृंगार । समुद्रक्के तेरेय शृंगार ॥
नारिगे गुणवे शृंगार । गगनक्के चंद्रमने शृंगार ॥
मानवजन्माचं उद्दिष्ट हे ईश्वर प्राप्त करून घेणं असलं पाहिजे. भौतिक सुख हे शाश्वत समाधान देत नाही, हे सांगताना म० बसवेश्वर म्हणतात...
समुद्रदोळगण सिंपिनंते बायि बिडुत्तिद्देनय्य
नीवल्लदे मत्तारु यन्नवरिल्ल नोडय्य
कूडलसंगमदेव
नीवल्लदोळ कोंबुवरिल्ल नोडय्य
अशी अनेक वचने या पुस्तकात वाचायला मिळतात. वचनांवर भाष्य करताना डॉ० स्वामींचं लेखन सहज मनाला भिडतं. भाष्य करताना डॉ० स्वामी स्वत: त्या वचनांशी किती समरस झाले याचा प्रत्यय वारंवार भाष्य वाचताना, त्यात दिलेल्या सामान्यांना पटेल अशा उदाहरणांवरून येतो. प्रत्येकापर्यंत भावार्थ पोहोचविण्याचा डॉ० स्वामींचा प्रयत्न खूपच प्रशंसनीय वाटतो. त्यातील सहजता मनाला भावणारी आहे.
‘बसवबोध’ हे पुस्तक सर्व वाचक-भक्तांचे प्रबोधन करणारे, त्यांच्या सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक जाणिवा प्रगल्भ करणारे आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ देखणे, म० बसवेश्वरांच्या सुरेख, सात्त्विक रूपाचे दर्शन घडविणारे आहे.
या पुस्तकातील वचने, भावानुवाद, भाष्य यांतील शब्दांची, वाक्यांची मांडणी सुटसुटीत आहे. शेवटी समाविष्ट केलेला भाग- मंगळवेढा येथील बसव साहित्य संमेलनातील डॉ० इरेश स्वामी यांचे अध्यक्षीय भाषण, म० बसवेश्वरांची शिकवण, सुभाषिते इत्यादी सुद्धा प्रेरक आहे.
प्रत्येकाने वाचावे, संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. म० बसवेश्वरांच्या वचनांना समाजापर्यंत नेणार्या या कार्यासाठी डॉ० स्वामींचे शतदा आभार. त्यांच्या लेखनकार्यास शुभेच्छा!
बसवबोध
डॉ० इरेश सदाशिव स्वामी,
विविधा प्रकाशन,
‘विद्या’, १२, ब्रह्मचैतन्य नगर,
विजापूर रस्ता, सोलापूर ४१३ ००४
चरभाष ९३७१०९९५००
No comments:
Post a Comment